breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ओळखपत्र पाहूनच मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकांवर प्रवेश
मुंबई महानगरात लोकल रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अनावश्यक रेल्वे प्रवास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ओळखपत्र पाहूनच मुंबई महानगरातील रेल्वे स्थानकांवर प्रवास करणाऱयांना प्रवेश देण्यात यावा, असे आदेश कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवेशी संबंध नाही अशा लोकांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देणार नसल्याचही शिवाजी दौंड यांनी दिले आहेत… अनावश्यक गर्दी किंवा प्रवास टाऴा असं वारंवार सांगूनही काही लोक गांभिर्याने ही बाब घ्यायला तयार नव्हते…त्यामुळे अखेर राज्य सरकारनं रेल्वे सेवाचं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत…