breaking-newsक्रिडा

ऑस्ट्रेलियात डे-नाईट कसोटी खेळण्यास बीसीसीआयचा नकार

मुंबई : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिकृतरित्या कळवले आहे.

टीम इंडिया या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक संघाच्या कार्यक्रमात दिवसरात्रीच्या कसोटी सामन्याचा समावेश करण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असतो. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री बीसीसीआयच्या प्रशासकांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.

गुलाबी चेंडूने दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी किमान 18 महिने तयारीची आवश्यकता असल्याचे शास्त्री यांनी बीसीसीआयला पटवून दिले. त्यानंतरच बीसीसीआयनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र लिहून, टीम इंडिया दिवसरात्रीच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे कळवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button