breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रादुर्भावामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. एसटीला ब्रेक लागल्याने एसटी महामंडळाचे उत्पनाची गणित बिघडली असून कर्मचाऱ्यांते वेतन थकले आहे. एप्रिल महिन्यातील वेतन कधी होणार? असा मोठा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला होता. राज्य सरकारने यात पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. 

राज्य सरकारने सवलतीमधील शिल्लक ३०० कोटीपैकी १५०  कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एप्रिलचे थकलेले वेतन मिळण्याचा कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  एसटी कामगार संघंटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदने पाठवून वेतन देण्याची मागणी केली होती.

त्यानंतर एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे सवलतीचे शिल्लक रक्कमेतील १५० कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एसटी महामंडळाकडून विविध प्रवासी वर्गाला प्रवासी तिकीट दरात सवलती दिल्या जातात. २०१९-२०२० या वर्षातील कालावधीतील सवलतीच्या दराची काही रक्कमेची महामंडळाला दिली जाते. काही रक्कम प्रवासी करामधून घेतली जाते. या कालावधी मधील १५० कोटींची रक्कम महामंडळाला देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button