breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
एमआयएमचे वारिस पठाण यांची माघार
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी उत्तर मध्य मुंबईतून न लढण्याचा निर्णय जाहीर केला असून औरंगाबादमधून आमदार इम्तियाझ जलील हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या दोन जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी एमआयएमकडे आग्रह धरलेला होता.
उत्तर मध्य मुंबईतून भाजप खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून पठाण यांना निवडणूक लढविण्याबाबत एमआयएमने विचारणा केली होती. मात्र आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून विधानसभेसाठी भायखळा येथून लढण्याची तयारी करीत असल्याचे पक्षाला कळविले आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे पठाण यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात जलील हे निवडणूक लढविणार आहेत.