breaking-newsराष्ट्रिय
उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला बसला वादळाचा तडाखा- ४० जण ठार
लखनऊ : उत्तर भारतात पारा चढला असतानाच सोमवारी रात्री उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांना वादळाचा तडाखा बसला. या वादळात आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत.
वादळी वारे आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे या तीन राज्यांमध्ये जीवितहानी झाली. वादळी वाऱ्यांमुळे बिहारमधील अनेक भागांमध्ये झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार बिहारमध्ये १७, झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १० जणांचा या वादळात मृत्यू झाला.