उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहांना दिले जाणार ‘मातोश्री’ नाव – उदय सामंत
मुंबई – राज्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना ‘मातोश्री’ हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मात्र या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वाचा :-‘शुन्याचे शंभर करण्याची आपल्यात धमक’, जयंत पाटलांचे वक्तव्य
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानाचे नाव देखील मातोश्री आहे. अशात सर्व वसतीगृहांना ‘मातोश्री’ हे नाव देण्याचा निर्णय घेतल्याने हा वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.वसतीगृहांना मातोश्री हे नाव देण्याची घोषणा करताना उदय सामंत म्हणाले की, घराबाहेर असलेल्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आईचं प्रेम महत्वाचं असतं. त्यामुळे त्यांना आईच्या प्रेमाची ऊब मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.तर दुसरीकडे उदय सामंत यांच्या या घोषणेनंतर भाजपकडून टीका करण्यात आली असून, नाव बदलून वसतिगृहांची व्यवस्था बदलणार आहे का? असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.