breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ईव्हीएम घोटाळ्यामुळेच भाजपचा पालघरला विजय

  • शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

 
मुंबई – निवडणूक आयोगाशी असलेले भाजपचे संगनमत आणि पालघरला इलेक्‍ट्रॉनिक मतदार यंत्रांमध्ये करण्यात आलेली छेडछाड यामुळेच भाजचा तेथे विजय झाला असल्याची तक्रार शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखातून केली आहे. भारतीय जनता पक्षाला पोटनिवडणूकांमध्ये मोठा फटका बसला असून देशातील नऊ विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकांपैकी आठ पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

देशातल्या अन्य लोकसभा पोटनिवडणुकांमध्येही त्यांचा पराभव झाला आहे पण त्यांनी पालघरला मात्र निवडणूक आयोगाशी संगनमत करून विजय मिळवला आहे. हा मतदार संघ त्यांच्यासाठी अवघड होता पण त्यांनी तेथे साम, दाम, दंड आणि भेदाची नीति अवलंबली. भाजपला पालघर मध्ये हिंदुत्व विचारसरणीचा उमेदवार सापडला नाही. त्यामुळे कॉंग्रेस विचारसरणीच्या उमेदवाराचे शुद्धीकरण करून घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली.

इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन मध्ये फेरफार करून त्यांनी तेथे विजय साकारला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. यात नमूद करण्यात आले आहे की मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या चार तासातच सुमारे शंभरावर मतदान यंत्रे बंद पडली. त्यामुळे 50 ते 60 हजार मतदारांना मतदान करता आले नाही. तेथील निवडणूक संपल्यानंतर निवडणूक आयोगाने पालघर मध्ये 46 टक्के मतदान झाल्याचे म्हटले होते पण 12 तासांनंतर हा आकडा 53 टक्के झाला. या बारा तासात नेमके असे काय झाले की तेथील मतदानाचे प्रमाण अचानक वाढले असा सवाल शिवसेनेने केला आहे. एका रात्रीत करण्यात आलेल्या भानामतीनेच हे साधले गेले असावे असे त्यांनी यात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button