breaking-newsराष्ट्रिय

आसाममध्ये बसचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

दिसपूर | महाईन्यूज

आसाममधील गोलपारा जिल्ह्यात एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात काही जण हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (4 फेब्रुवारी) आसामच्या गोलपारामध्ये एक बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे.

धुबरीवरून ही बस गुवाहाटीला जात होती. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावर आदळली आणि पलटी झाली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास 30 लोक जखमी झालेले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी आसामच्या सिबसागर जिल्ह्यात देखील एक भीषण अपघात झाला होता. यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button