breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात- पंकजा मुंडे

बीड – पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तिथे आज (5 जानेवारी) महापूजेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना पंकजा मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या कार्याची आठवण करुन दिली. यावेळी धनंजय मुंडे हेदेखील मंचावर उपस्थित होते.

आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात. आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपण माणूस म्हणून जन्म घेतला असल्याने आपल्या समोर काही आदर्श असतो आणि तो आदर्श बघून आपणही आदर्श निर्माण करतो. वामनभाऊंचा आदर्श आपल्यासमोर आहे. सहज आदर्श निर्माण होत नाही. खूप त्याग निर्माण करावा लागतो. खूप बलिदान करावं लागतं. खूप कठीण परिस्थीतून जगावं लागतं. तेव्हा लोकं त्यांच्या मृत्यूनंतर वर्षोंवर्ष त्यांची आठवण काढतात. मग ते नेते असतील किंवा संत. असंच गोपीनाथ मुंडे यांची आठवण आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे. खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट समाजाला समर्पित करावे लागतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button