आपण जसं पंढरपूरला जातो, तसं ते अयोध्येत गेले – राज्यमंत्री आदिती तटकरे
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अयोध्या दाै-यांचा महाविकास आघाडीवर कसलाही परिणाम नाही
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
महाराष्ट्रात शिवसेना-काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीन भिन्न विचारधारेच्या पक्षांनी एकत्रित येवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारने नुकतेच शंभर दिवस पुर्ण केले. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अयोध्या दाैरा करुन आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व सोडले नसल्याचे म्हटले आहे. त्याचा परिमाण महाविकास आघाडी सरकारवर होवून हे सरकार किती दिवस टिकणार असा प्रश्न राज्यमंत्री अदिती तटकरे यांना विचारण्यात आला.
तटकरे म्हणाल्या की, जसं की आपण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. तसं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अयोध्याला गेले आहेत. त्या दाै-यामुळे महाविकास आघाडी सरकारवर कसलाही परिणाम होणार नाही, हे सरकार ‘किमान समान कार्यक्रम’ यानूसारच विकास कामे करु लागले आहे.
… अमृताजींचे हे त्याचे वैयक्तिक मत
सोशल मीडियावर ट्रोलिंग हा प्रकार नवीन नाही. व्यक्तीगत स्वातंत्र्यामुळे प्रत्येकजण आपआपले मत मांडत असतात. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परस्थितीवर ही मते मांडली जातात. त्यानूसार अमृता फडणवीस यांनीही त्यांचे मत मांडले आहे. ज्यांना ते पटतं ते लाईक करतात. ज्यांना पटत नाही ते डीसलाईक करुन ट्रोल करीत असतात. त्यामुळे जसं मत मांडण्याचा अधिकार आहे, तसं ट्रोल करण्याचाही प्रत्येकाला अधिकार आहे. त्यापध्दतीने ते वागत असतात.