आंध्रातील 12 हजार खेड्यांना गुगल स्टेशनद्वारे इंटरनेट सेवा
नवी दिल्ली – आंध्रप्रदेशातील सुमारे बारा हजार गावांना गुगल स्टेटनद्वारे इंटनेट सेवा पुरवली जाणार असून त्यासाठी गुगलने आंध्रप्रदेश स्टेट फायबर नेट लि कंपनीशी करार केला आहे. याद्वारे तेथील सुमारे एक कोटी लोकांना वायफाय अंतर्गत इंटरनेट सेवा दिली जाणार असून रेल्वे स्थानकावरील हजारो प्रवाशांना गुगलद्वारे इंटरनेट सेवा जशी उपलब्ध करून दिली जात आहे त्याच प्रमाणे आंध्रातील खेड्यापाड्यातही ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सध्या भारतातील चारशे रेल्वे स्थानकावर गुगलची वायफाय सेवा सुरू आहे. आंध्रात झालेल्या करारानुसार या वर्षाच्या अ
खेरीला आम्ही या सर्व खेड्यांना इंटरनेट सेवा सुरू करू अशी माहिती गुगलचे महाव्यवस्थापक सीसेर सेनगुप्ता यांनी दिली. ऑन लाईन पेमेंट ऍप म्हणून गुगलने तेज ही सेवा सुरू केली असून त्याचा उपयोग आता देशातील सुमारे 2 कोटी 20 लाख लोक करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.