breaking-newsराष्ट्रिय

अल्पावधीत अणुचाचणीस भारत सज्ज

नवी दिल्ली : भारताने १९९८ साली राजस्थानमधील पोखरण येथे केलेल्या अणुचाचण्यांनंतर पुन्हा चाचणी न घेण्याचे बंधन स्वत:वर घालून घेतले असले तरीही कधीही अणुचाचणी करण्याची तयारी आहे, अशी ग्वाही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत दिली.

भारताने राजस्थान येथील पोखरण येथे १९७४ साली पहिली अणुचाचणी घेतली. त्यानंतर तेथेच ११ आणि १३ मे १९९८ रोजी पाच अणुचाचण्या घेतल्या. त्यात हायड्रोजन बॉम्बचाही समावेश होता. त्यानंतर मात्र चाचण्या बंद करण्याचे भारताने जाहीर केले. डॉ. ख्रिस्तोफर यांनी स्पष्ट केले की, १९९८ नंतर भारताच्या अणुतंत्रज्ञानातील प्रगती थांबली नसून देश या बाबतीत प्रगत देशांची बरोबरी करू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button