अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा, सुप्रिम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली | महाईन्यूज
अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालावर आज (दि. 9 नोव्हेंबर) सकाळी 11.15 च्या सुमारास अंतिम निर्णय दिला गेला. “अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी नियम बनवा” असे आदेश सर्वाच्च न्यायलयाने केंद्राला दिले आहे.
संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची, वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायलयात स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे. त्याशिवाय मशीद कधी बांधली याची माहिती मिळालेली नाही. पण याचे बांधकाम बाबरच्या काळात झाले होते. दरम्यान मशिदीच्या खाली जी वास्तू होती, ती इस्लामिक नव्हती. मंदिर तोडून मशीद बांधल्याची ठोस माहिती नाही. अस सांगत शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरचा दावा फेटाळला आहे.
अयोध्या प्रकरणी निकाल लागल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्टेशन, बस डेपो, विमानतळ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील काळात या मुद्द्यावर दैनंदिन सुनावणी घेत सर्व पक्षांच्या बाजू ऐकल्या. त्यानंतर हा निर्णय दिला आहे.