breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अयोध्येत राममंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा : सचिन सावंत

मुंबई | महाईन्यूज

‘अयोध्येत राममंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव जी गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केलेले होते. पण ते कुठे व्हावे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर विषय मिटला असल्याने कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे,’ असं विधान काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी केलेले आहे.

सावंत यांनी ट्विट करत काँग्रेसची राम मंदिरासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पुढे लिहिलंय, ‘आम्ही पक्षीय राजकारण व जनप्रदर्शनासाठी मंदिरात जात नाही. आस्थेने आत्मशुध्दीसाठी ईश्वरचरणी लीन व्हावे ही आमची भावना आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम त्याग प्रेम बलिदान करुणा व समतेचे प्रतिक आहेत ‌ त्यांच्या दर्शनाने कोणाहीबद्दलचा द्वेष, तिरस्कार नाहीसा होतो व प्रेम सद्भावना जागृत होते. जे तेथे जातील त्या सगळ्यांच्या मनात करुणा व समाजातील सर्व वर्गांबाबत सद्भावना जागृत होवो, ही आम्ही प्रार्थना करतो. यातच देशहित आहे. या प्रार्थनेकरिता काँग्रेसचे अनेक जण भविष्यात राममंदिरात जातीलच!’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button