अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट शेअर करूनही अजित पवारांनी केली तीच चूक
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार 06 मार्चला ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवारांनी कविता सादर केली होती. त्यांच्या कवितांना आमदारांकडून दादही मिळाली.
‘असफलता एक चुनौती है, स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो’
अशी कविता सादर करताना आव्हानं स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार असं म्हटलं होतं. यानंतर पवार यांनी सांगतिलं की ही कविता हरिवंशराय बच्चन यांची आहे.
या कवितेबाबत सर्वसामान्यांचीही अशी समजूत आहे कि ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही कविता हरिवंशराय बच्चन यांनीच लिहिली होती. मात्र सत्य काही वेगळंच आहे. ही सुप्रसिद्ध कविता हरिवंशराय बच्चन यांनी नाही तर कवी सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी ही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सगळ्यांना माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’, बर्याच लोकांना ही कविता बाबूजींनी लिहिली आहे असंच वाटतं. मात्र ही कविता माझ्या वडीलांनी लिहिलेली नाही. तर या कवितेचे कवी सोहनलाल द्विवेदी आहेत.