breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
अजित पवारांना केव्हाही अटक होऊ शकते – रावसाहेब दानवे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यात हात काळे झाल्याने अजित पवार यांच्या दारात आता पोलीस उभे आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यांची घबराट उडाळ्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचे सांगत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ‘अटल संकल्प महासंमेलन’आयोजित केले आहे. या संमेलनाला मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते.