breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित डोवाल यांची चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील; राज ठाकरे

कोल्हापूर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद हे राजकीय बळी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा खळबळजनक दावा त्यांनी कोल्हापुरातील सभेत केला.

निवडणुका जवळ येतील तशा मोठ्या घटना घडवल्या जातील आणि तुमचं लक्ष त्याकडे वळवलं जाईल. नोटाबंदी, राफेल प्रकरण जनता विसरावी यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे जनतेनं जागं राहावं, असंही त्यांनी नमूद केलं.  पाकिस्तानचं पाणी सरकार बंद करणार आहे. पाकच्या पाण्यात अमित शहा झोपणार का?, अशी खिल्ली राज यांनी उडवली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button