breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी
मुंबई – लग्न करण्यासाठी मुलींना पळवून आणू, असं बेताल विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. माझ्या विधानानं माता-भगिनींची मनं दुखावली. त्याबद्दल मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली आहे. माता-भगिनींचा आदर करत मी पुन्हा त्यांची माफी मागतो, अशा शब्दांमध्ये राम कदम यांनी ट्विटरवर माफी मागितली.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं. ‘झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे,’ असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राम कदम यांच्या विधानाबद्दल भाजपानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.