breaking-newsराष्ट्रिय

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली – कोरोनाचे गंभीर संकट कोसळलेले असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे. मात्र ‘यूजीसी’च्या या परीक्षासक्तीला 31 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जीव धोक्यात घालणे हितावह नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

दरम्यान, यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह 13 राज्यांच्या सरकारचा कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास विरोध आहे. तरीही ‘यूजीसी’ मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button