अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत उदय सामंत यांचा मोठा निर्णय
मुंबई | मागील काही दिवसांपासून अतिंम वर्षाच्या परीक्षांबाबत संभ्रम होते. यावरून अनेकांकडून टीकाही केली जात होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यानंतरही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपात्कालीन व्यवस्थापनाची बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून उदय सामंत या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि काही नेते उपस्थित होते. यावेळी कोरोनाबाबत चर्चा करण्यात आली. यात तीन महत्त्वाचे विषय अजेंड्यावर होते. यात अंतिम वर्षाच्या अव्यवसायिक शिक्षणाबाबत, व्यवसायिक शिक्षण आणि एटीकेटी हे तीन विषय बैठकीत मुख्य होते.
या बैठकीच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत घेण्यात आले. निर्णय घेताना अव्यवसायिक अभ्यासक्रम, व्यवसायिक अभ्यासक्रम आणि एटीकेटीबाबत निर्णय घेण्यात आला. यातील पहिला निर्णय म्हणजे मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे विद्यापीठाने त्यांच्याकडून घेऊन योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल लावावा. याचाच अर्थ ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी विद्यापीठाला अर्ज लिहून कळवावे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही असे विद्यापीठाला कळवावे. यानंतर या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल. तसेच आणखीही काही निर्णय घेण्यात आले.