महाराष्ट्र
सिंधुदुर्गात समुद्र किनाऱ्यावर ८ जण बुडाले;
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या वायरी येथे समुद्र किनाऱ्यावर आठ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मरण पावलेले आठही जण हे बेळगावच्या मराठा इंजिनीअरिंग कॉलेजचे होते. सर्वांचे मृतदेह हाती लागले आहेत. मृतांमध्ये ३ विद्यार्थीनी, ४ विद्यार्थी आणि एका प्राध्यपकाचाही समावेश आहे. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
वायरीच्या समुद्र किनाऱ्यावर एकूण ११ जण बुडाले होते त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. पण तिघांमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने शिक्षिकेला धक्का बसला असून त्या बेशुद्ध झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगावच्या मराठा इंजिनीअरिंग कॉलेजचे दोन प्राध्यापक आणि ५० विद्यार्थी हे वायरी येथे पर्यटनासाठी आले होते. यावेळी समुद्राच्या भरतीमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी बुडाल्याचं सांगण्यात येतंय.