breaking-newsराष्ट्रिय

‘शिवभक्त म्हणवणारे राहुल गांधी राम मंदिरावर गप्प का ?’

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी देशभरातील मंदिरात जाण्याऐवजी अयोध्येतील राम मंदिरास खुलेपणाने पाठिंबा देण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.

गिरिराज सिंह पाटणा येथे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी देशातील मंदिरात जाण्याऐवजी अयाध्येतील राम मंदिर निर्मितीस खुलेपणाने पाठिंबा द्यावा. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता राम जन्मभूमी आंदोलनाचे समर्थन करेल याची त्यांनी घोषणा करावी. राहुल गांधी वास्तवात हिंदू आहेत की नाही, याची मला कल्पना नाही. जर ते हिंदू असतील तर त्यांचे गोत्र काय आणि ते आहाराचे पालन करतात का, असा सवाल केला. राहुल हे स्वत: शिवभक्त असल्याचे सांगत असतात. यावर भाष्य करताना गिरिराज सिंह म्हणाले की, जर त्यांनी राम मंदिराबाबत मौन राखले तर त्यांची शिवभक्ती स्वीकार्य नसेल.

गिरिराज सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीही राममंदिराबाबत भाष्य केले होते. आता हिंदुंचा संयम तुटत आहे. जर हिंदुंचा संयम तुटला तर काय होईल, याची मला भीती वाटते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी समाचार घेतला होता. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी गिरिराज सिंह यांच्यावर टीका केली होती. कोणाचाही संयम तुटलेला नाही. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे हिंदू नाहीत. ठेकेदार बनू नका, असा टोला त्यांनी लगावला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button