breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही-मुख्यमंत्री

मुंबई : शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांनी आज पुण्यातील मेळाव्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना आलेल्या धमक्या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशय व्यक्त केला होता.

“मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही! ” असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य काय ते बाहेर येईलच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचे आमंत्रणच दिले आहे. आज रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.  नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

पुण्यातल्या शिंदे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आलेल्या धमक्या या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशयही पवारांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button