breaking-newsमहाराष्ट्र

विदर्भातील मतदानावेळी EVM बाबत शेकडो तक्रारी

मुंबई: लोकसभेच्या सात जागांसाठी विदर्भात पार पडलेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावरून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने जवळपास ५० तक्रारी ई-मेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.

मतदानावेळी ईव्हीएम मशिनचा वेग मंद असल्याने काही ठिकाणी एक मतदान करण्यासाठी चार- चार मिनिटे लागत होती. काही मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था केलेली नव्हती, तर काही मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याच्या ५० हून अधिक तक्रारी काँग्रेसच्या वॉर रुमकडे आल्या. सर्वात जास्त तक्रारी या नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ मतदारसंघातून आल्या. या तक्रारी मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, यांच्याकडे पाठवण्यात आल्या तसेच पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना १०० पेक्षा जास्त फोन करुन या तक्रारींची माहिती देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button