लोकसभेची उमेदवारी नाकारली तर कॉँग्रेसला ‘रामराम’ – सुजय विखे
नगर – कॉँग्रेस आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे कॉँग्रेसकडेच लोकसभा उमेदवारीची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून न घेणारा भाजप हा आमचा नंबर एकचा शत्रू आहे. यामुळे कॉँग्रेसकडूनच उमेदवारी मागणार आहे. कॉँग्रेसने नाकारले तर पक्षीय जोडे बाजूला ठेऊन पुढे जाऊ, असे उद्गार डॉ. सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भूमिका मांडली.
नगर तालुक्यातील खडकी येथील कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. यावेळी काँगेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या अनिता हराळ, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, दत्ता नारळे, सरपंच अर्चना कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, बाबुर्डी बेंदचे उपसरपंच अण्णा चोभे, प्रवीण कोठुळे, हरिभाऊ निकम, बापूसाहेब कोठुळे, भास्करराव कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, ज्ञानदेव भोसले, शरद कोठुळे, अमृत कोठुळे, सुनील कोठूळे आदी उपस्थित होते.