breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजस्थानात लग्नसमारंभात भिंत कोसळून २५ जणांचा मृत्यू

भरतपूर: राजस्थानातल्या भरतपूर जिल्ह्यात चामुंडा माता मंदिर भागात बुधवारी रात्री वादळी वारे आणि पावसामुळे एका लग्नाच्या हॉलची भिंत कोसळली. या दुर्घटनेत २५ जण मृत्युमुखी पडले. हॉलमध्ये लग्नसोहळा सुरू होता. मृतांमध्ये ४ लहान मुलांचाही समावेश आहे.
वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे ही घटना घडली. ही भिंत सुमारे ८० फुटांची होती. एकूण ३० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १२ पुरुष, ९ महिला आणि ४ बालकांचा समावेश आहे. जयपूरहुन आलेल्या वऱ्हाडातल्या अनेकांचा मृतांमध्ये समावेश आहे.
घटनेचं वृत्त कळताच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदतकार्य सुरू आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button