मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा- उमा पानसरे
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात भाजप सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत उमा पानसरे यांनी भाजप सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
तपास यंत्रणांनी आरोपींना पकडण्यातबाबत न्यायालयात हतबलता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे म्हणाल्या, ‘भाजप सरकारला पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा तपासच करायचा नाही. त्यामुळे सरकार एकप्रकारे खुन्यांना पाठीशी घालत आहे. सरकारला बुद्धिवादी विचारवंतांची आवश्यकता नसून त्यांना साधुसंत, योगी आणि भ्रष्टाचारी लोकांची आवश्यकता आहे. यामुळेच खुन्यांचा तपास लागत नाही. याला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी उमा पानसरे यांनी केली.