breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
मालदीवचा भारताला धक्का; ‘गिफ्ट’ केले परत
नवी दिल्ली : मालदीवसोबतचे संबंध सुधारण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा धक्का बसला आहे. भारताने मालदीवच्या नौदलाला दोन हेलिकॉप्टर्स भेट म्हणून दिली होती. यापैकी एक हेलिकॉप्टर परत नेण्याची सूचना मालदीवकडून करण्यात आली आहे.
भारताला परत करणार असलेल्या हेलिकॉप्टरचा वापर मालदीवमधील अड्डू द्वीपवर होतोय. लेटर ऑफ एक्सचेंज(LoE ) कालबाह्य झाल्याने हे हेलिकॉप्टर परत करत असल्याचे मालदीवने म्हटलंय. या प्रकरणामुळे भारत आणि मालदीवमधील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य संबंधांवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
दरम्यान, चीनकडून मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. चीनने मालदीवमध्ये पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्याचा धडाका लावला आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या मदतीने चीनकडून ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ची उभारणी केली जाते आहे. यामुळे भारताची मोठी कोंडी होऊ शकते.