breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मान्सूनपूर्व पावसाने केळी बागायतदारांचे 100 कोटीचे नुकसान

जळगाव : मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक ठिकाणच्या पिकांचे चांगलच नुकसान केले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्याला तर या पावसानं चांगलंच झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पावसाने केळी बागायतदारांचे थोडे नव्हे तर तब्बल शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे इथंला शेतकरी हवालदिल झाला आहे.

मान्सूनपूर्व पावासाने मालेगाव तालुक्यातील गावांना चांगलाच तडाखा दिला. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह  बरसलेल्या पावसाने देवळा तालुक्यातील मेशी, वासोळ, महालपाटणे, देवपूरपाडा परिसरात अनेक वृक्ष कोलमडून पडली तर विजेच्या तारा तुटल्याने वीजही गायब झाली. अनेक घरांचे, पोल्ट्री फॉर्म आणि कांदा चाळींचे पत्रे उडाले. घरांची कौलं आणि गुरांचे शेडही उडाले.

अचानक बरसलेल्या पावसामुळे उघड्यावर पडलेला शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. डाळींब बागांचं आतोनात नुकसान झालं. कांदा ओला झाला तर आंब्याचे देखील नुकसान झाले. तसेच मालेगाव तालुक्यातील सवंदगावमध्येही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने  गोठ्याजवळील विद्युत खांब कोसळला. त्याखाली सापडून एक म्हैस आणि पाच शेळ्या ठार झाल्या. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना  दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button