breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मधल्या फळीत फलंदाजीचे दडपण येत नाही – अंबाती रायुडू

मुंबई: सध्या अंबाती रायुडूला भारतीय एकदिवसीय संघात जागा मिळाली आहे. मात्र आपल्याला मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी दडपण येत नसल्याचे रायुडूने स्पष्ट केलं आहे.

मी सध्या मालिकेवर माझं लक्ष केंद्रीत केलं आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला मधल्या फळीत फलंदाजी करण्याचं फारसं दडपण येत नाही. मी गेली अनेक वर्ष मधल्या फळीत फलंदाजी करतोय, त्यामुळी ही गोष्ट मी पहिल्यांदा करतोय अशातला काही भाग नाही. रायुडूने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. इंग्लंड दौऱ्यात वन-डे मालिकेत यो-यो टेस्ट नापास झाल्यामुळे रायुडूला संघातून माघार घ्यावी लागली होती.

सध्या मी आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो आहे. सध्या सलामीचे फलंदाज भारतासाठी चांगली कामगिरी करतायत, त्यामुळे ज्यावेळी फलंदाजीची संधी येते त्यावेळी डोकं शांत ठेवून प्रसंगानुरुप फलंदाजी करण्याचं मोठं आव्हान मधल्या फळीतल्या फलंदाजांवर असतं. सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे उरलेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button