breaking-newsमनोरंजन

भारत-पाकिस्तान संबंधांबरोबर ‘या’ मुद्द्यावर तयार झाला ‘मुल्क’

अभिनेत्री तापसी पन्नूची महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘मुल्क’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मुल्क’ हा चित्रपट कोर्टरुम ड्रामा प्रकारात मोडणारा असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून दहशतवाद, घातपात, हिंदू- मुस्लीम वाद अशा महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तयार करण्यासाठी काही महत्वाचे मुद्देदेखील विचारात घेण्यात आले होते. या मुद्द्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच हा चित्रपट साकार झाला आहे.

‘मुल्क’ या चित्रपटामध्ये तापसू पन्नू आणि ऋषी कपूर हे महत्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार असून यामध्ये आजच्या काळात समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जातीधर्मावरुन अनेक काळापासून वादविवाद सुरु आहेत. त्यामुळे या परिस्थिती कोणताही बदल होईल असं दिसून येत नाही. त्यामुळे या मुद्द्याचा आवर्जुन या चित्रपटात समावेश करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये अनेक वर्षांपासून सुरु असलेले वादावर प्रकाश टाकण्यात आला असून या संघर्षाचे परिणाम काय होतात ते या चित्रपटामध्ये दर्शविण्यात आलं आहे.

कोण हिंदू किंवा कोण मुस्लीम हे महत्वाचं नाही. जो व्यक्ती मदतीला धावून येतो. त्या व्यक्तीच्या मानवतेचं दर्शन या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. त्यांमुळे प्रत्येक व्यक्तीला समोरच्या व्यक्तीमधील चूका शोधण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शोधण्यासाठी प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे कौंटूबिक स्वरुपाचा आहे, असं अभिनेता रजत कपूर याने सांगितलं. त्यामुळे भारत-पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील संबंधावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अनेक सामाजिक,सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button