breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाजपचा सुवर्णकाळ अजून आलेला नाही: अमित शहा

भुवनेश्वर: ‘भाजपचा सुवर्णकाळ अजून आलेला नाही. पंचायत ते पार्लमेंटपर्यंत भाजपची सत्ता यायला हवी. देशातील १३ राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र देशातील प्रत्येक राज्यात भाजपची सत्ता असावी हा आपला संकल्प असला पाहिजे. हा संकल्प जेव्हा पूर्ण होईल तोच भाजपचा खरा सुवर्णकाळ असेल’, असं आवाहन आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत केलं.
‘२०१४ मध्ये भाजपचा विजय झाला तेव्हा हा भाजपचा सुवर्णकाळ असं म्हटलं गेलं. त्यानंतर २०१७ म्हणजेच यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतरही अनेकजणांनी त्याचा पुनरूच्चार केला. मात्र मला वाटतं भाजपचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे’, असे शहा पुढे म्हणाले.
भुवनेश्वर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला शहा मार्गदर्शन करत होते. २०१९मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सध्या ३१ पक्ष असून एनडीएची मोट कशी अधिक घट्ट होत आहे, हे सांगण्याचा शहा यांनी प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button