पाणपोई नव्हे, हे तर समतेचे पाणी – सुबोध मेडसीकर
- भाई वैद्य आणि शरद राव यांच्या नावे पाणपोईचे उदघाटन
पिंपरी – फुले शाहू आंबेडकर विचार प्रतिष्ठान आणि कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि जेष्ट कामगार नेते शरद राव यांच्या समरणार्थ इंदिरा गांधी पुलाजवळ पाणपोई सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन नगरसेविका कोमल मेवानी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, दीपक मेवानी, बी. आर. मुडगुळकर, आशा कांबळे, सोपानराव चव्हाण , प्रल्हाद कांबळे, रमेश शिंदे, इसाक राज, सतिश प्रधान, हाफिज कुरेशी, दैवत पाटील, जाफर कुरेशी आदी उपस्थित होते.
मेडसीकर म्हणाले की, मी शिक्षण घेत असताना भाई वैद्य आणि डॉ. बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवाट चळवळ सुरू केली होती. यामुळे ग्रामीण भागात जातियता नष्ठ होण्यास सुरवात झाली. आज या ठिकाणी भाई वैद्य यांच्या आणि शरद राव यांच्या नावे पाणपोईचे उदघाटन होते, यामुळे हे साधे पाणी नसून समतेचे पाणी आहे, असे मेडसीकर म्हणाले.
नगरसेविका कोमल मेवानी म्हणाल्या की, माझ्या मतदार संघात भाई वैद्य आणि शरद राव यांच्या नावे पाणपोई होत आहे. याचा आनंद झाला. या ठिकाणी भाई वैद्य यांच्या नावाने वाचनालय देखील सुरू करू यासाठी सर्व मदत आम्ही करणार आहे.
बाबा कांबळे म्हणाले की, भाई वैद्य हे वंचित, शोषित, तळागाळातील लोकांचे नेते होते. भाईंनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणी रुजविण्यासाठी प्रयत्न केले.