breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु

पिंपरी :  पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून  दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सलग तिसर्‍या वर्षी गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात आज गुरुवारी खा.  बारणे यांच्या हस्ते  करण्यात आला. या प्रसंगी पाट बंधारे विभागाचे उपअभियंता नानासाहेब मटकरी, शाखा अधिकारी मनोहर खाडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर पवना धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असुन पवना धरणातील पाण्याचा वापर पिंपरी-चिंचवड शहराला १०० टक्के पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो.पिंपरी चिंचवड महापालिका ४९० एम. एल.डी व एम.आय.डी.सी १०० एम.एल.डी पाणी धरणातून उचलते. पिंपरी-चिंचवड बरोबर तळेगांव, देहूरोड,शहर व शहराबाहेरील उद्योग आणि मावळमधील शेतक-यांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उद्भवणारी पाणी टंचाई टाळण्यासाठी आणि पाणी साठा वाढवण्यासाठी या पवना धरणामध्ये साठलेला गाळ काढणे आवश्यक होते. खासदार बारणे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला. परंतु,पाट बंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात हद्द व कार्यक्षेत्राच्या वादात हे काम सुरू होऊ शकले नाही. अखेर स्वतः पुढाकार घेत गेल्या तीन वर्षापासून खासदार स्थानिक विकास निधीतून हे काम सुरू करण्यात आले.

या कामासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. महसूल, पाटबंधारे विभागाची मदत मिळाली. दोन वर्षात धरणातून ७५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. धरणात ४५ दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध  आहे. याचा फायदा पिंपरी चिंचवड शहर, तळेगांव, देहूरोड या शहरांना बरोबर स्थानिक शेतकर्‍यांना देखील झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button