breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात धर्माच्या नावावर भेदभाव केला जात नाही

  • आर्चबिशप यांच्या आवाहनाच्या संबंधात गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – दिल्लीच्या आर्चबिशप यांनी देशातील खराब राजकीय वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व देशभर 2019 च्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रार्थना घ्याव्यात अशी सुचना करणारे पत्र जारी केले आहे. त्यातून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की भारतात धर्माच्या नावावर कधीही भेदभाव केला जात नाही. त्यांनी म्हटले आहे की भारतात कधीही या प्रकाराला अनुमती दिली जाणार नाही.

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काऊटो यांनी आपल्या अन्य ख्रिश्‍चन धर्मगुरूंना पाठवलेल्या पत्रात देशातील सद्य स्थितीच्या विरोधात प्रार्थना करण्याचे व शुक्रवारी उपास करण्याचे आवाहन केले आहे. देशातील धर्मनिपेक्षता धोक्‍यात आली आहे, त्यातून लोकशाहीं तत्वांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर या तत्वांच्या विरोधात प्रार्थना आणि उपावास करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यात त्यांनी मोदी सरकारचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख या सरकारच्या विरोधातच असून त्यात आर्चबिशप यांनी म्हटले आहे की 2019 च्या निवडणुकांमध्ये आपल्याला नवीन सरकार मिळेल त्यासाठी देशात प्रार्थना सुरू करा. त्यांच्या या आवाहनाला भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button