breaking-newsराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये पाककडून गोळीबार सुरूच; 4 नागरिकांचा मृत्यू
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. अरनिया आणि सांबा सेक्टरनंतर पाकिस्तानी रेंजर्सचा आरएसपुरामध्येही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात सकाळपासून आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी कथुआ जिल्ह्यातल्या हिरानगर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात राम पॉल नावाच्या नागरिकाचा मृत्यू झाला.
पाकिस्तानने आतापर्यंत बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांना लक्ष्य केले आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचाही मारा करण्यात येतोय. मृत नागरिकांमध्ये तीन जण हिरानगर सेक्टरमधल्या लोदी गावातले असून, एक जण अरनिया सेक्टरमधला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता