breaking-newsराष्ट्रिय
गोरक्षणासाठी राजस्थान सरकारचा दारूवर अधिभार?
जयपूर (राजस्थान) – राजस्थान सरकार गोरक्षणासाठी दारूवर अधिभार लावण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या बदललेल्या नियमांमुळे राजस्थानच्या दुष्काळपीडित जिल्ह्यांमधील सुमारे 1700 गोशाऴांना मिळणारे सरकारी अनुदान जवळपास बंद झालेले आहे. या सर्व गोशाळांमध्ये सुमारे 6 लाख (पाच लाख,शाहाऐंशी हजार दोनशे सत्तावन्न) गाईगुरे आहेत.
राजस्थानमधील बाडमेर, जैसोलमेर, पाली, जालौर सह 13 जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार गोशाळांना गुरांचे शिबिर म्हणून मान्यता असली तरी त्यात पूर्वीपासून असलेल्या गुरांसाठी अनुदान मिळू शकणार नाही. त्यासाठीच दारूवर अधिभार लावण्याची तयारी चालू नाहे.
या अधिभारामुळे सरकारकडे मोठा निधी जमा होणार आहे आणि त्याचा उपयोग गोशाऴांना अनुदान देण्यासाठी करण्यात येणार आहे.