महाराष्ट्र
गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर: नरेंद्र मोदी
नागपूर : प्रत्येक गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर मिळेल, असे सांगताना ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी आज दीक्षा भूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विकासाचे कोणतेही स्वप्न हे ऊर्जेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही, असे मोदी यांनी सांगितले. दीक्षाभूमीनंतर मोदी यांनी कोराडीत जाऊन औष्णिक विद्यूत वीज निर्मिती प्रकल्पातीन नव्या वीज संचाचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.