‘खरे देशद्रोही कोण?’; शहीद करकरेंवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांचा सवाल

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधकांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘आता खरे देशद्रोही कोण?’ असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करताना शहीद झालेल्या करकरेंबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या साध्वी यांचा निषेध केला आहे. ट्विटवरुन अनेक पक्षांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
खरे देशद्रोही कोण?, आम आदमी पक्षाचा सवाल
या देशद्रोही सरकारला धडा शिकवा: सीपीआय (एम)
भाजपाच्या दृष्टीने हा देशद्रोह: मेहबुबा मुफ्ती
मोदी शाह समर्थन करणार का?: माजिद मेनन
शहीदांचा अपमान कसा करु शकतात: औवेसी
खरे देशद्रोही कोण?