breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी!
कराड : कर्नाटकाला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. कर्नाटकातील दुष्काळावर मात्रा म्हणून कोयना धरणातील पाणी सोडण्यात येत आहे. मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून २१६७ क्युसेक, असा एकूण ३०७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.
कोयना धरणातून २.६५ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हे पाणी कराडपर्यंत कोयना नदीतून व पुढे कृष्णा नदीपात्रातून कर्नाटकाकडे सोडले जाणार आहे. या पाण्याचे मोजमाप महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या राज्यांच्या सीमेवरील कृष्णा नदीवरील राजापूर बांधाऱ्याच्या ठिकाणी करण्यात येत आहे.