breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कचरा विलगीकरणानंतर त्याचा पुनर्वापर करणे आवश्यक – महापौर नितीन काळजे

  • घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
  • विविध संघटना, गृहसंस्थांचा सहभाग

पिंपरी – कच-याची समस्या सर्वत्र असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कच-याच्या विलगीकरणाबरोबरच पुनर्वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरीकांनी सहकार्य केल्यास आपले शहर देशात नव्हे, तर सर्व जगात प्रथम क्रमांकाचे होईल, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील ॲटो क्लस्टर येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभाग कार्यालय व आरोग्य विभाग आणि शहरातल्या विविध संस्था व संघटना यांच्याकरीता घेण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्‌धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता अयुब खान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, स्मिता झगडे, आशा राऊत, सर्व प्रभागाचे सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक तसेच ग्राहकपंचायतीचे रमेश सरदेसाई, रस्ते व्यवस्थापनाचे आय. एम. मर्चंट, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, संत निरंकारी चॉरिटेबल फाउंडेशनचे सदस्य, पलाश, सुमन शिल्प, सुंदरबन सोसायटीचे सदस्य, क्रिसीलचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर काळजे म्हणाले की, कच-याच्या विलगीकरणाचे नियोजन योग्य रितीने करावे लागेल. मूलभूत सुविधा देत असताना कच-याची समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे लागेल.

सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, स्वच्छतेकडे एक काम म्हणून न पाहता त्याकडे एक मिशन म्हणून पाहिल्यास व स्वच्छता एक मिशन घेऊन काम केल्यास स्वच्छ शहर होण्यास वेळ लागणार नाही. पिंपरी-चिंचवड शहर हे स्वच्छते बाबतीत अव्वल नंबरचे शहर झाले पाहिजे. शहराच्या स्वच्छतेसाठी अधिकारी कर्मचारी काम करतातच, परंतु या शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ विविध संस्था, संघटना कार्यरत आहेत. हा सहभाग असाच असावा, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख वक्ते राजेंद्र सराफ यांनी कच-याची विल्हेवाट, पुनर्वापर व कचरा निर्मितीच्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन केले. क्रिसीलचे समिर पालपर्थी यांनीही सादरीकरण केले. पलाश सोसायटीच्या स्वाती रोकडे यांनीही अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी मानले.

आयुक्त म्हणतात…
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, मागील दशकामध्ये शहराची वाढ ७०% झाली असून भविष्यातही ती सातत्याने राहणार आहे. कारण, शहराचा सर्वांगिण विकास व शहराची प्लॅनिंग प्रमाणे ठरविण्यात आलेली विकासाची दिशा, यामुळे या शहराकडे येणारा नागरिक आकर्षित झालेला आहे. नागरिकरण ही समस्या म्हणून न पाहता कामकाजाची संधी म्हणून पहावे लागणार आहे. येणा-या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शहराच्या विकासासाठी नियोजनबध्द काम केल्यास विकासाबाबत अडचणी निर्माण होणार नाही. शहराची झपाट्याने वाढ होत असल्याने दरवर्षाला ५% कचरा वाढणार आहे. यावर उपाय म्हणून कच-याचे विलगीकरण जागच्या जागी झाले पाहिजे. विलगीकरणानंतर त्यांचे मुल्य वाढते व विल्हेवाट व्यवस्थित केल्यास कच-याबाबतच्या समस्या सोडविणे सुलभ होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button