breaking-newsमनोरंजन

आमीर खानला स्वाईन फ्लूची लागण; ‘वॉटर कप’च्या कार्यक्रमाला गैरहजर

पुणे-स्वाईन फ्लू झाल्याने आमीर खान पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिला आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी 3 तालुक्यांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा 30 तालुक्यांचा समावेश होता. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांचा आणि विजेत्यांच्या सन्मानासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने पुण्यातील बालेवाडीमध्ये पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येत आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस, नीता अंबाऩी आणि 4 हजार गावांमधले ग्रामस्थ उपस्थित आहेत. या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी उपस्थितांशी मराठीत संवाद साधला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button