breaking-newsराष्ट्रिय
आधार-पॅन जोडणीमुळे ३३ हजार कोटींचे गैरव्यवहार उघड
नवी दिल्ली : आधार क्रमांक पॅनकार्डला जोडण्याच्या प्रक्रियेमुळे तब्बल ३३ हजार कोटी रुपयांचे गैरव्यवहार उघड झाल्याची माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. यातील अनेक व्यवहार हे संशयास्पद असून संबंधितांविरोधात पुरावे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राप्तिकर खात्याने दिला आहे.
पॅन कार्डला आधारची जोडणी करण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडून यापूर्वीच सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार देशभरातील ३७ कोटी पॅनकार्डधारकांपैकी १७ कोटी ४० लाख पॅनकार्डधारकांनी ही जोडणी केली आहे. यातील चार कोटी ४० लाख नागरिकांनी करविवरण पत्र सादर केली आहेत. यातूनच प्राप्तिकर खात्याला या व्यवहारांची माहिती मिळाली आहे.