breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अन्नधान्याचा उच्चांकी साठा; भाववाढ होण्याची शक्यता कमीच
नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) असलेला तांदळाचा साठा एप्रिल अखेरपर्यंत २५ मिलियन टनांपर्यंत (मेट्रिक टन) पोहचला आहे. हे प्रमाण २०१३ पासून उच्चांकी आहे.यामुळे येत्या काळात बाजरात अन्नधान्याचा तुटवडा भासून भाव वाढण्याची शक्यता कम झाली आहे.
तांदळाचा साठा उच्चांकी असला, तरी तो आणखी सर्वाधिक पातळीवर पोहचलेला नाही. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून वर्षभरात अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी अन्न महामंडळाकडे ३२ मेट्रिक टन तांदूळ आणि ३६ मेट्रिक टन गव्हाच्या साठ्याची गरज असते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात साठा असल्याने त्याची आता खुल्या बाजारात विक्री करण्याचे नियोजन अन्न महामंडळाकडून सुरू आहे.