breaking-newsमनोरंजन
अजिंक्य-शीतलने फेसबुकद्वारे दिले लग्नाचे निमंत्रण
झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत आज्या आणि शीतली लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वत: आज्या आणि शीतलीने या लग्नाचं आमंत्रण दिलंय. फेसबुक लाईव्ह करुन त्यांनी या लग्नाचे निमंत्रण प्रेक्षकांना दिले आहे. येत्या ३० मेला त्यांचा विवाहसोहळा संध्याकाळी सात वाजता संपन्न होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या सोहळ्याला हजेरी लावावी असे आवाहन या दोघांनी केले आहे. आज्या आर्मीत भरती झाला. या दोघांच्या प्रेमाचे रुपांतर आता नात्यात होत आहे. ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल ५ मध्ये आहे.