हेतू साध्य व्हायचा असेल तर पोस्ट टोकदार करा – अमित शहा
पुणे – सोशल माध्यमातून पोस्ट मागील हेतू साध्य करायचा असेल, तर तुमची पोस्ट कमी शब्दात, अधिक टोकदार करा, पक्षाची ध्येय धोरणे, सरकारने घेतलेल्या विविध योजना तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवा, असा कानमंत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.
पुण्यातील बालगंर्धव मंदिरात आज (रविवारी) राज्यभरातून आलेल्या भाजपच्या सोशल मिडियाच्या स्वयंसेवकांशी त्यांनी संवाद साधून दिला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्तिथ होते.
यावेळी शहा म्हणाले, पुढच्या निवडणूकचा प्रचार हा सोशल मिडिया च्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे त्याची तयारी करताना आपण जी पोस्ट टाकतोय ती कश्यासाठी टाकतोय, त्यात काय लिहितोय, ती कशी लिहितोय या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपली पोस्ट ही टोकदार असायला हवी. त्याचा परिणाम लोकांवर व्हायला हवा. माध्यमाचा वापर करणारी प्रशिक्षित फोज आपल्याकडे तयार पाहिजे. फक्त मला वापरता येते असे करून चालणार नाही. कशासाठी वापर करायचा हे पक्के माहिती पाहिजे. ते माहिती नसेल तर मग त्याचा उपयोग होणार नाही.