breaking-newsराष्ट्रिय

संयुक्तराष्ट्रांच्या काश्‍मीर अहवालावर भारताच्या लष्करप्रमुखांची टीका

नवी दिल्ली – काश्‍मीरात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा अहवाल संयुक्तराष्ट्रांनी दिला आहे त्यावर भारताच्या लष्करप्रमुखांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. हा हेतुपुरस्सर अहवाल असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भारतीय लष्कराच्या मानवाधिकाराजपणुकीचे रेकॉर्ड काश्‍मीरी जनता आणि आंतरराष्टीय समुदायाला चांगले माहिती आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. त्यामुळे मला या विषयी अधिक बोलण्याची गरज नाही. जे काही आहे ते साऱ्या जगापुढे आहे. त्यामुळे भारताने या अहवालाविषयी फार चिंता करण्याची गरज नाहीं असेही त्यांनी नमूद केले आहे.जनरल बिपीन रावत हे आज येथे पत्रकारांशी बोलत होते.

संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार समितीचा हा अहवाल याच महिन्यात सादर करण्यात आला आहे त्यात पाकिस्तान व्याप्त काश्‍मीर आणि भारतातील काश्‍मीरविषयीच्या स्थितीची माहिती देण्यात आली आहे. भारताने हा अहवाल या आधीच फेटाळला आहे. चुकीच्या माहितीवर हा अहवाल आधारीत असल्याचे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button