संभाजी महाराजांच्या भूमिकेला लोकांनी भावनिक होवून मतदान केलं – शिवाजी आढळराव पाटील
शिरुर – शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस कमकुवत आहे. शिरुरमध्ये लोकसभा निवडणुक प्रचारात जातीचं राजकारण झालं, लोकांनी भावनिक होत संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केलं, असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पराभवाचं विश्लेषण करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राज्यसभा हा माझा विषय नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संधी मिळाली तरी राज्यसभेवर जाणार नाही, असंही त्यांनी सांगत चर्चेल पुर्णविराम दिला.
माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा नियमित भरणारा जनता दरबार आजही रविवारीच भरला. यावेळी अनेकांनी शिरुर खासदार आढळराव यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी ते बोलत होते.
शिरुर लोकसभा मतदार संघात माझ्या पराभवामुळे मला वाईट वाटलं नाही. तर चौथ्यांदा निवडून आलो असलो तर शिवसेनेला महत्वाचं मंत्रिपद मिळालं असतं. हे मंत्रिपद गेल्यानं तालुक्यातील जनतेला दुःख झालं आहे, असं स्पष्टीकरण आढळराव यांनी दिलं. माझ्या पराभवाच वचपा आंबेगावची जनता नक्की भरून काढेल, असं सांगत थेट राजकीय विरोधक दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. यापुढेही जनता दरबार भरला जाईल, अशी स्पष्टोक्ती आढळराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीत मी उभा राहणार नाही तर जनता ठरवेल तो उमेदवार इथून दिला जाईल, पण आपल्या दादाला ज्याने पाडलं त्याचा आंबेगावची जनता समाचार घेईल, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.