breaking-newsराष्ट्रिय

संपूर्ण चीन अग्नी 5 मुळे येणार भारताच्या टप्प्यात

  • मारकक्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर 

नवी दिल्ली – आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 या सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात समावेश आहे. हे क्षेपणास्त्र सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचे लष्करी सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. “अग्नी 5′ ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता “अग्नी 5′ मध्ये आहे.

“अग्नी 5′ मारक क्षमता असलेली ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच “अग्नी 5′ स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्त करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी “अग्नी 5′ च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button