breaking-newsमहाराष्ट्र

शेतकऱ्यांवरील दडपशाहीची किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल – अजित पवार

मुंबई

-दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे पोलिसांकडून बळाचा वापर झाला ते सरकारचे अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. असले सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करते, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडते, सरकार शेतकरीविरोधात लाठीचार्ज करते. हे सरकारंच शेतकरी विरोधात आहे तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना आधारभूत किंमत नाही, कर्जमाफी नाही. एकीकडे मोठ्या उद्योगपतींना हजारो-कोटींची कर्जमाफी होते. मोठ्या बॅंकेमध्ये त्यांचे कर्ज माफ करण्याकरिता सरकार त्या ठिकाणी मोठी रक्कम देत आहे. त्यातच कोट्याधीश होणारी माणसे आपला पैसा लुबाडून परदेशात पळून जात आहेत व आपले सरकार बघ्याची भूमिका घेतंय. इथे मात्र जो शेतकरी संपूर्ण देशाला अन्न पिकवतो, धान्य पिकवतो, सगळ्यांना जगवतो. अशा या लाखाच्या पोशिंद्यावर हे लाठीचार्ज करतात. या राज्यकर्त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button